📌
कविवर्य नारायण सुर्वे : एक मुक्त चिंतन
🚩🚩🚩
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे
एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.
-अर्थातच, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे!
कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकरांनी नारायण सुर्वे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर अनेक कवितांमधून कविवर्य नारायण सुर्वे लखलखत राहिले. त्यांच्या शब्दांनी चळवळ उभी केली. त्यांची कविता म्हणजे घणाघात झाली. महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. कुठलाही आडपडदा न ठेवता थेट हल्लाबोल करणारी ही कविता कामगारांच्या गळ्यातील ताईत झाली नसती तरच नवल! आयुष्याची सायंकाळ कुसुमाग्रजांच्या शब्दछायेत घालवावी या उद्देशाने सुर्व्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं. दोन महान शब्दसाधकांच्या राहिवासाने नाशिकनगरी काव्यमय झाली. शेवटचा श्वास मात्र सुर्व्यांनी त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत घेतला. त्यांच्याच काही रचनांचा हा ठेवा खास आपल्यासाठी!
ऐसा गा मी ब्रह्म हा नारायण सुर्वे यांचा पहिलाच काव्यसंग्रह! त्यानंतर त्यांचे 'जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ, सनद' असे सर्वच संग्रह मैलाचे दगड ठरले!
एका कवीचं काव्यविश्व आणि त्याची खरी परिस्थिती सुर्व्यांनी खूप चपखल पकडली आहे. कल्पनेच्या आकाशाचा मालक असलेल्या कवीला या कवितेच्या शेवटच्या ओळीत सुर्वे जमिनीवर आणून ठेवतात!
घालीन मी साऱ्या । ब्रह्मांडास पाठी ।
सोडवीन गाठी । दिक्कालांच्या ॥
विश्वाचे गोकुळ | खेळे माझ्या दारी ।
सूर्याची लगोरी टिचवीन ॥
ढगांचा गा हत्ती । बांधीन मी दारी।
भरीन घागरी | अमृताने ||
ऐसा गा मी ब्रह्म । विश्वाचा आधार ।
खोलीस लाचार | हक्काचिया ॥
परंतु निसर्गाशी गप्पा मारताना कवी अगदी एकरूप होऊन जातो. पक्ष्यांशी बोलताना
हिरव्या पक्ष्यांनो फुलवा ही बाग
भूपाळीत ओवा मालकंस राग
अशी साद घालतो, तर अगदी सुर्यालाही नमस्कार करायला भाग पाडतो!
अगा सूर्यदेवा स्पर्श करा येथे
ऐश्या भूमीपुढे नमवावे माथे
परंतु प्रत्येकच कवीला आर्थिक बाबतीत सद्भाग्य मिळतेच असे नव्हे.
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते
अशी अवस्थाही बऱ्याच जणांची होते. सुर्वे ती दुखरी नस पकडतात. त्याचबरोबर पत्नीचा आपल्या पतीवरचा विश्वास त्याला किती सजग रहायला भाग पाडतो तेही दोन ओळीत सांगतात
तुझ्या पापण्यांचा पहारा माझ्या शब्दांवर असतो
म्हणून माझ्या पद्यपंक्तीत व्यभिचाराचा अंश नसतो
वाह! प्रत्येक कवीला हे भाग्य मिळावं आणि त्याच्या व्यभिचाराचा स्पर्शही होऊ नये ही भावनाच उच्च आहे.
मला खात्री आहे की, पुढील कवितेची लहानपणी पारायणं केलेले माझ्यासह आपल्यापैकी बरेचजण असतील, ती आठवण ताजी व्हावी म्हणून पूर्ण कविताच देतो
दोन दिवस वाट पाहाण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली
हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेंहि क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले.
दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दुःखात गेले!
प्रत्येक शब्द अगदी तावून सुलाखून निघालेला. भाकरीचा चंद्र तेव्हापासून आजतागायत मराठी साहित्यिकांचा परवलीचा शब्द बनला. शब्दांचं सोनं करण्याचं भागग असं सगळ्याच कवींच्या भाग्यात असतं थोडीच? आपला भवताल, बेगडी माणसं यांतही स्वतःला जागं ठेवताना ते मनाला बजावतात
त्याच दिवशी मनाच्या एका
कोऱ्या पानावर लिहिले, "हे नारायणा,
अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट
लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा."
36 कडव्यांची माझे विद्यापीठ ही कविता वाचताना आपण केव्हा सुर्वेमय होतो ते आपल्याही लक्षात येत नाही
कामगारांचं कष्टकऱ्यांचं आयुष्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडताना सुर्व्यांनी कधीच शब्दांची कसर केली नाही. येतील तसे शब्द येऊ दिले, त्यांना प्रमाण भाषेच्या बेड्यांमध्ये अडकू दिलं नाही. मुंबई महानगरातील कॉस्मोपोलिटन पोर्टस वर काम करणाऱ्या कामगारांची जी रांगडी भाषा तीच सुर्व्यांच्या कवितेची भाषा झाली!
आफ्रिकी चाचा चिडे, धुके, म्हणे: "काम नहीं करेगा."
चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा?"
टरकावले घामेजले खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरू पहिले वाक्य बोलला,
"हमारा खून झिंदाबाद !" वाटले, चाचाने उलचलाच पृथ्वीगोल
खळाळल्या नसानसांत लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल
अशा शब्दांत सुर्व्यांनी अक्षरशः निखारे ओतले!
नेहरूंच्या निधनाच्या दिवशी वेगवेगळ्या थरातील लोकांनी आपापल्या परीने संवेदना प्रकट केल्या, तिथे कामगारांची प्रतिक्रिया अशी होती-
क्या हुआ ए सुंद्रे ! '
आज लोबन मत जला! ...नेहरू गये !!
'सच; तो चलो आज छुट्टी !..
शीण पेलणारे जग खाटेवर कलले.
नेहरू गेले त्यावेळची गोष्ट!
कामगारांचं नेतृत्व करणाऱ्याला प्रलोभनांची ताटं ओवाळण्यासाठी तयारच असतात. परंतु ज्याचं हृदय सच्च्या कामगाराचं आहे, तो त्यांना बळी पडत नाही उलट जिद्दीने पुढे जात राहतो. सुर्व्यांच्या खालील ओळी याची प्रचिती देतात.
झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.
अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.
शिवाय, पाठीमागून येणाऱ्यांना सांगायलाही ते विसरत नाहीत
मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार
"सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही."
समस्त कविलोकांसाठी एक जळजळीत वास्तव सुर्व्यांनी दाऊदचाचाच्या माध्यमातून तेव्हाच सांगून ठेवलंय
एक ध्यान ठेव बेटा !
शब्द लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्किल है.
प्रत्येक संघर्षानंतर फलप्राप्ती अटळ आहे हा आशावाद सांगताना सुर्वे सोप्या शब्दांत म्हणतात
याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे!
सुर्व्यांची मनिआडर ही कविता आपल्याला सुन्न करून टाकते. देहव्यापार करून मुंबईत पोट भरणाऱ्या बाईचं निमित्त करून सुर्वे समाजमनाचा तळ अक्षरशः ढवळून काढतात.
आन हे बगा....
असंबी लिवा,
का मी खुस हायः
आंग ठनाकतंय पर म्हनावं,
गावापक्षा बरं हाय.
ढगावानी मानूस येतो आन
म्हामूर होतो बगा...
पन बबडी
डूक धरल्यावानी परतेकाला इचारते,
'माज्याकडं येन्याआदी
किती जनीकडे गेलता !
अवं तो पुरुस;
बसा म्हनलं; बसावं,
त्येच्या बायकांनी दावं का सोडावं...
- हे तुमाला सांगते.
म्होरं लिवा -
मनीआइर उशिरानी का व्हयना,
पर जाती.
म्हनावं- नवी वजरटीक घड़वलीय
वाक्या पाटिवल्यात इष्णूकडं
आन् धा कमी पन्नास रुपयबी
त्येचं गंगीला याक पुस्तक प्या.
नाम्याला चरडी
रोजचं धा पैसं द्या
म्हंजी पळल पोरगं साळ ला
- दोघासनी मुका बी लिवा.
आता हितंबी म्हागाई वाढलीय.
मानसाला नवी चादर लागती.
गिलासावरलं पानी उडालंय...
नुसता कंद्या न्हाई पुरत,
पंकाबी लागतो.
- हे नगा लिवू,
पर तुमी ऐकता म्हनून म्हनले.
बगा, मला हसू येतंय,
सांगू का नगं, असं व्हतंय...
मागं याक गि-हाईक आलं,
'हितं रहान्यापरीस
बाईल व्हशील का?" म्हनलं....
'आता हाय की मी शेजंला तुमच्या-
म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.
अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.
हे कातडं लई वंगाळ बगा.
मानूस गोचिडीवानी चिकाटतं.
आन् कायबी बोलून जातं.
पुरुस जातीचं मला हसूबी येतं,
अन रडूबी येतं बगा.....
पर ह्या कातड्याची
ढोरावानी वड असती मानसाला!
-
लोचट माणसांच्या सोज्वळपणाचा बुरखा टराटरा फाडणारी ही कविता!
कामगार असला म्हणजे तो फक्त ढोरकष्ट उपसण्यासाठीच असतो असं नव्हे. त्याच्या आतही एक संवेदनशील मन असतं. म्हणूनच एक कामगार त्याच्या मालकाला स्पष्ट म्हणतो
सगळी कामं सांगा,
तेवढं ते घरटं पाडायचं काम सांगू नगा
जीव उदास व्हतो...
केवढ्या कमी शब्दांत केवढं हे जगण्याचं भान आणि तत्त्वज्ञान!
बाह्यरूप हे माणसाचं खरं रूप नव्हे! तुम्ही कितीही नटा, माणूस मेल्यावर त्याच्या शरीराची दुर्गंधी ही येणारच! मग शुद्ध माणूस सापडावा कसा?
हा धेह रोज आपन धुतो
गंधटिळं लावतो.
इट्टल गजरात सकाळधरनं मिरवतो,
इटाळ नगं म्हून सांभाळतो...
पोथीपुराणं वाचतो...
सुद्ध करतो... आन् इतकी घान.
मानसाला इतकी घान असती?
दुसऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी इथली व्यवस्था सामान्य माणसाला कधीही वर येऊ देत नाही. त्याला हे कळलं तरी तो काही करू शकत नाही, इतकंच म्हणतो...
साला अपन लोगच पांडू है
इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है'
बाकीच्यांनी पायरी सोडली तरी तो तसं करण्यास धजावत नाही. 'माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय' नोंदवताना तो म्हणतो
हे माझ्या देशा;
सूर्यकुलाचे आपणही एक सभासद म्हणून,
सूर्यकुलाला शोभेसेच वर्तन व्हावे!
म्हणून हा देश अजूनही टिकून आहे.
तेव्हा मोबाईल्स नव्हते, पण बायकोला निरोप देण्याची नवऱ्याची पद्धत तर बघा,
माझ्याकडून काहीच कळले नाही;
तर समज,
मी ठीकच असेन.
कातडीबचाव लोकांचं ढोंग समाजासमोर आणताना हा कामगार म्हणतो
म्हणजे काय की
घरंदाज माणसेसुद्धा आता बिथरलीत
पण ती बोलत नाहीत
आम्ही बोलतो!
मर्ढेकरांशी एक बातचीत ही कविता मुळातच अभ्यासण्यासारखी आहे.मर्ढेकरांचा गणपत वाणी, हो तोच बिडी पिणारा, सुर्व्यांनी त्यांच्या शब्दात त्याचा समाचार घेतलाय. ते म्हणतात,
परंतु मर्ढेकर !
गणपत वाण्याचा एकूणच प्रवास....
काड्यांचा चोथा केव्हाच थुंकला त्याने.
माडीही बांधली आहे.
विधानसभेत 'फाड-फाड' बोलतो.
दाराशी नवी गाडी आहे.
या कवितेत कविवर्य नारायण सुर्वे यांनी एक जळजळीत वास्तव सांगून ठेवलंय. माझ्यासाठी ते एखाद्या दिपस्तंभासारखं आहे,जे मी कायम डोळ्यांसमोर ठेवतो.ते वाक्य म्हणजे
....कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात !
'तुमचंच नाव लिवा' या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय शेवटाकडे कसं येता येईल? बापाचं नाव ठाऊक नसलेल्या पोराचं नाव शाळेत घालताना त्याची आई फँड्री चित्रपटातल्या शेवटच्या दृश्यातला दगड आपल्या अंगावर भिरकवते!
मास्तर, लिवा -
तुमचंच नाव लिवा;
खरं सांगते;
मरीआईला समरून सांगते,
लिवा तुमी
होच्या केसाची जटा बगा मास्तर:
कसा नागाचा फडा हाय त्यो....
अवं, देवाच देणं हाय त्ये.. देवावं.
मास्तर, जिमीन उतमातती...
व्हय उफानती, पन
नांगर घातल्याबिना आन्,
बी पेरल्या बिना,
रोप वर उगत का? उगतं? बोला.
मंग बापाच्या जागी माजं नाव लिवून कसं चालंल?
बाप न्हाई म्हनलं तर पोराचं कसं जमंल....
कनच्याबी देवाचं नांव नगा लिवू
मानसाचंच लिहा..
देवानं काय केलंय हो,
वटी तेनं भरली नाही...
तुमचंच लिवा.
जात नगा इचारू,
अवं, आमी कुना एकाची का बायली हावंत मास्तर,
घरोट्यातल्या बाया नव्हत आमी,
तेवढं कुठलं नशिबाला...
तेचा जलम हितलाच.
फाटला जलामला त्यो,
पॉट निरनाखाली सराकलं;
ना सुईण, ना काय जवळ,
मन चराकलं...पन मग हराकालं.
पड, पोरा पड पाया.
पड़ ह्येनच्या पाया.
पर तेवढं तुमचंच नाव लिहा
•
प्रिय मित्रहो,
आपण आपल्या कविता सर्वांसमोर मांडण्यासाठी किती उत्सुक असतो! परंतु आपण इतर साहित्य किती वाचतो? ह्या प्रश्नाने मला छळू नये म्हणून मांडलेला हा प्रपंच!!
✒️
rajshelkesir@gmail.com
कविवर्य नारायण सुर्वे : एक मुक्त चिंतन
🚩🚩🚩
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा करणार आहे
एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.
-अर्थातच, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे!
कविश्रेष्ठ तात्यासाहेब शिरवाडकरांनी नारायण सुर्वे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर अनेक कवितांमधून कविवर्य नारायण सुर्वे लखलखत राहिले. त्यांच्या शब्दांनी चळवळ उभी केली. त्यांची कविता म्हणजे घणाघात झाली. महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. कुठलाही आडपडदा न ठेवता थेट हल्लाबोल करणारी ही कविता कामगारांच्या गळ्यातील ताईत झाली नसती तरच नवल! आयुष्याची सायंकाळ कुसुमाग्रजांच्या शब्दछायेत घालवावी या उद्देशाने सुर्व्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं. दोन महान शब्दसाधकांच्या राहिवासाने नाशिकनगरी काव्यमय झाली. शेवटचा श्वास मात्र सुर्व्यांनी त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत घेतला. त्यांच्याच काही रचनांचा हा ठेवा खास आपल्यासाठी!
ऐसा गा मी ब्रह्म हा नारायण सुर्वे यांचा पहिलाच काव्यसंग्रह! त्यानंतर त्यांचे 'जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ, सनद' असे सर्वच संग्रह मैलाचे दगड ठरले!
एका कवीचं काव्यविश्व आणि त्याची खरी परिस्थिती सुर्व्यांनी खूप चपखल पकडली आहे. कल्पनेच्या आकाशाचा मालक असलेल्या कवीला या कवितेच्या शेवटच्या ओळीत सुर्वे जमिनीवर आणून ठेवतात!
घालीन मी साऱ्या । ब्रह्मांडास पाठी ।
सोडवीन गाठी । दिक्कालांच्या ॥
विश्वाचे गोकुळ | खेळे माझ्या दारी ।
सूर्याची लगोरी टिचवीन ॥
ढगांचा गा हत्ती । बांधीन मी दारी।
भरीन घागरी | अमृताने ||
ऐसा गा मी ब्रह्म । विश्वाचा आधार ।
खोलीस लाचार | हक्काचिया ॥
परंतु निसर्गाशी गप्पा मारताना कवी अगदी एकरूप होऊन जातो. पक्ष्यांशी बोलताना
हिरव्या पक्ष्यांनो फुलवा ही बाग
भूपाळीत ओवा मालकंस राग
अशी साद घालतो, तर अगदी सुर्यालाही नमस्कार करायला भाग पाडतो!
अगा सूर्यदेवा स्पर्श करा येथे
ऐश्या भूमीपुढे नमवावे माथे
परंतु प्रत्येकच कवीला आर्थिक बाबतीत सद्भाग्य मिळतेच असे नव्हे.
कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते
निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते
अशी अवस्थाही बऱ्याच जणांची होते. सुर्वे ती दुखरी नस पकडतात. त्याचबरोबर पत्नीचा आपल्या पतीवरचा विश्वास त्याला किती सजग रहायला भाग पाडतो तेही दोन ओळीत सांगतात
तुझ्या पापण्यांचा पहारा माझ्या शब्दांवर असतो
म्हणून माझ्या पद्यपंक्तीत व्यभिचाराचा अंश नसतो
वाह! प्रत्येक कवीला हे भाग्य मिळावं आणि त्याच्या व्यभिचाराचा स्पर्शही होऊ नये ही भावनाच उच्च आहे.
मला खात्री आहे की, पुढील कवितेची लहानपणी पारायणं केलेले माझ्यासह आपल्यापैकी बरेचजण असतील, ती आठवण ताजी व्हावी म्हणून पूर्ण कविताच देतो
दोन दिवस वाट पाहाण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली
हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेंहि क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले.
दोन दिवस वाट पाहाण्यात गेले, दोन दुःखात गेले!
प्रत्येक शब्द अगदी तावून सुलाखून निघालेला. भाकरीचा चंद्र तेव्हापासून आजतागायत मराठी साहित्यिकांचा परवलीचा शब्द बनला. शब्दांचं सोनं करण्याचं भागग असं सगळ्याच कवींच्या भाग्यात असतं थोडीच? आपला भवताल, बेगडी माणसं यांतही स्वतःला जागं ठेवताना ते मनाला बजावतात
त्याच दिवशी मनाच्या एका
कोऱ्या पानावर लिहिले, "हे नारायणा,
अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट
लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा."
36 कडव्यांची माझे विद्यापीठ ही कविता वाचताना आपण केव्हा सुर्वेमय होतो ते आपल्याही लक्षात येत नाही
कामगारांचं कष्टकऱ्यांचं आयुष्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडताना सुर्व्यांनी कधीच शब्दांची कसर केली नाही. येतील तसे शब्द येऊ दिले, त्यांना प्रमाण भाषेच्या बेड्यांमध्ये अडकू दिलं नाही. मुंबई महानगरातील कॉस्मोपोलिटन पोर्टस वर काम करणाऱ्या कामगारांची जी रांगडी भाषा तीच सुर्व्यांच्या कवितेची भाषा झाली!
आफ्रिकी चाचा चिडे, धुके, म्हणे: "काम नहीं करेगा."
चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा?"
टरकावले घामेजले खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरू पहिले वाक्य बोलला,
"हमारा खून झिंदाबाद !" वाटले, चाचाने उलचलाच पृथ्वीगोल
खळाळल्या नसानसांत लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल
अशा शब्दांत सुर्व्यांनी अक्षरशः निखारे ओतले!
नेहरूंच्या निधनाच्या दिवशी वेगवेगळ्या थरातील लोकांनी आपापल्या परीने संवेदना प्रकट केल्या, तिथे कामगारांची प्रतिक्रिया अशी होती-
क्या हुआ ए सुंद्रे ! '
आज लोबन मत जला! ...नेहरू गये !!
'सच; तो चलो आज छुट्टी !..
शीण पेलणारे जग खाटेवर कलले.
नेहरू गेले त्यावेळची गोष्ट!
कामगारांचं नेतृत्व करणाऱ्याला प्रलोभनांची ताटं ओवाळण्यासाठी तयारच असतात. परंतु ज्याचं हृदय सच्च्या कामगाराचं आहे, तो त्यांना बळी पडत नाही उलट जिद्दीने पुढे जात राहतो. सुर्व्यांच्या खालील ओळी याची प्रचिती देतात.
झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.
अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.
शिवाय, पाठीमागून येणाऱ्यांना सांगायलाही ते विसरत नाहीत
मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार
"सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही."
समस्त कविलोकांसाठी एक जळजळीत वास्तव सुर्व्यांनी दाऊदचाचाच्या माध्यमातून तेव्हाच सांगून ठेवलंय
एक ध्यान ठेव बेटा !
शब्द लिखना बडा सोपा है
सब्दासाठी जीना मुश्किल है.
प्रत्येक संघर्षानंतर फलप्राप्ती अटळ आहे हा आशावाद सांगताना सुर्वे सोप्या शब्दांत म्हणतात
याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे!
सुर्व्यांची मनिआडर ही कविता आपल्याला सुन्न करून टाकते. देहव्यापार करून मुंबईत पोट भरणाऱ्या बाईचं निमित्त करून सुर्वे समाजमनाचा तळ अक्षरशः ढवळून काढतात.
आन हे बगा....
असंबी लिवा,
का मी खुस हायः
आंग ठनाकतंय पर म्हनावं,
गावापक्षा बरं हाय.
ढगावानी मानूस येतो आन
म्हामूर होतो बगा...
पन बबडी
डूक धरल्यावानी परतेकाला इचारते,
'माज्याकडं येन्याआदी
किती जनीकडे गेलता !
अवं तो पुरुस;
बसा म्हनलं; बसावं,
त्येच्या बायकांनी दावं का सोडावं...
- हे तुमाला सांगते.
म्होरं लिवा -
मनीआइर उशिरानी का व्हयना,
पर जाती.
म्हनावं- नवी वजरटीक घड़वलीय
वाक्या पाटिवल्यात इष्णूकडं
आन् धा कमी पन्नास रुपयबी
त्येचं गंगीला याक पुस्तक प्या.
नाम्याला चरडी
रोजचं धा पैसं द्या
म्हंजी पळल पोरगं साळ ला
- दोघासनी मुका बी लिवा.
आता हितंबी म्हागाई वाढलीय.
मानसाला नवी चादर लागती.
गिलासावरलं पानी उडालंय...
नुसता कंद्या न्हाई पुरत,
पंकाबी लागतो.
- हे नगा लिवू,
पर तुमी ऐकता म्हनून म्हनले.
बगा, मला हसू येतंय,
सांगू का नगं, असं व्हतंय...
मागं याक गि-हाईक आलं,
'हितं रहान्यापरीस
बाईल व्हशील का?" म्हनलं....
'आता हाय की मी शेजंला तुमच्या-
म्या म्हनलं, तवा ते तरपाटलं.
अख्ख्या पुरुस जातीचं मला हसू आलं.
हे कातडं लई वंगाळ बगा.
मानूस गोचिडीवानी चिकाटतं.
आन् कायबी बोलून जातं.
पुरुस जातीचं मला हसूबी येतं,
अन रडूबी येतं बगा.....
पर ह्या कातड्याची
ढोरावानी वड असती मानसाला!
-
लोचट माणसांच्या सोज्वळपणाचा बुरखा टराटरा फाडणारी ही कविता!
कामगार असला म्हणजे तो फक्त ढोरकष्ट उपसण्यासाठीच असतो असं नव्हे. त्याच्या आतही एक संवेदनशील मन असतं. म्हणूनच एक कामगार त्याच्या मालकाला स्पष्ट म्हणतो
सगळी कामं सांगा,
तेवढं ते घरटं पाडायचं काम सांगू नगा
जीव उदास व्हतो...
केवढ्या कमी शब्दांत केवढं हे जगण्याचं भान आणि तत्त्वज्ञान!
बाह्यरूप हे माणसाचं खरं रूप नव्हे! तुम्ही कितीही नटा, माणूस मेल्यावर त्याच्या शरीराची दुर्गंधी ही येणारच! मग शुद्ध माणूस सापडावा कसा?
हा धेह रोज आपन धुतो
गंधटिळं लावतो.
इट्टल गजरात सकाळधरनं मिरवतो,
इटाळ नगं म्हून सांभाळतो...
पोथीपुराणं वाचतो...
सुद्ध करतो... आन् इतकी घान.
मानसाला इतकी घान असती?
दुसऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी इथली व्यवस्था सामान्य माणसाला कधीही वर येऊ देत नाही. त्याला हे कळलं तरी तो काही करू शकत नाही, इतकंच म्हणतो...
साला अपन लोगच पांडू है
इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है'
बाकीच्यांनी पायरी सोडली तरी तो तसं करण्यास धजावत नाही. 'माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय' नोंदवताना तो म्हणतो
हे माझ्या देशा;
सूर्यकुलाचे आपणही एक सभासद म्हणून,
सूर्यकुलाला शोभेसेच वर्तन व्हावे!
म्हणून हा देश अजूनही टिकून आहे.
तेव्हा मोबाईल्स नव्हते, पण बायकोला निरोप देण्याची नवऱ्याची पद्धत तर बघा,
माझ्याकडून काहीच कळले नाही;
तर समज,
मी ठीकच असेन.
कातडीबचाव लोकांचं ढोंग समाजासमोर आणताना हा कामगार म्हणतो
म्हणजे काय की
घरंदाज माणसेसुद्धा आता बिथरलीत
पण ती बोलत नाहीत
आम्ही बोलतो!
मर्ढेकरांशी एक बातचीत ही कविता मुळातच अभ्यासण्यासारखी आहे.मर्ढेकरांचा गणपत वाणी, हो तोच बिडी पिणारा, सुर्व्यांनी त्यांच्या शब्दात त्याचा समाचार घेतलाय. ते म्हणतात,
परंतु मर्ढेकर !
गणपत वाण्याचा एकूणच प्रवास....
काड्यांचा चोथा केव्हाच थुंकला त्याने.
माडीही बांधली आहे.
विधानसभेत 'फाड-फाड' बोलतो.
दाराशी नवी गाडी आहे.
या कवितेत कविवर्य नारायण सुर्वे यांनी एक जळजळीत वास्तव सांगून ठेवलंय. माझ्यासाठी ते एखाद्या दिपस्तंभासारखं आहे,जे मी कायम डोळ्यांसमोर ठेवतो.ते वाक्य म्हणजे
....कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात !
'तुमचंच नाव लिवा' या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय शेवटाकडे कसं येता येईल? बापाचं नाव ठाऊक नसलेल्या पोराचं नाव शाळेत घालताना त्याची आई फँड्री चित्रपटातल्या शेवटच्या दृश्यातला दगड आपल्या अंगावर भिरकवते!
मास्तर, लिवा -
तुमचंच नाव लिवा;
खरं सांगते;
मरीआईला समरून सांगते,
लिवा तुमी
होच्या केसाची जटा बगा मास्तर:
कसा नागाचा फडा हाय त्यो....
अवं, देवाच देणं हाय त्ये.. देवावं.
मास्तर, जिमीन उतमातती...
व्हय उफानती, पन
नांगर घातल्याबिना आन्,
बी पेरल्या बिना,
रोप वर उगत का? उगतं? बोला.
मंग बापाच्या जागी माजं नाव लिवून कसं चालंल?
बाप न्हाई म्हनलं तर पोराचं कसं जमंल....
कनच्याबी देवाचं नांव नगा लिवू
मानसाचंच लिहा..
देवानं काय केलंय हो,
वटी तेनं भरली नाही...
तुमचंच लिवा.
जात नगा इचारू,
अवं, आमी कुना एकाची का बायली हावंत मास्तर,
घरोट्यातल्या बाया नव्हत आमी,
तेवढं कुठलं नशिबाला...
तेचा जलम हितलाच.
फाटला जलामला त्यो,
पॉट निरनाखाली सराकलं;
ना सुईण, ना काय जवळ,
मन चराकलं...पन मग हराकालं.
पड, पोरा पड पाया.
पड़ ह्येनच्या पाया.
पर तेवढं तुमचंच नाव लिहा
•
प्रिय मित्रहो,
आपण आपल्या कविता सर्वांसमोर मांडण्यासाठी किती उत्सुक असतो! परंतु आपण इतर साहित्य किती वाचतो? ह्या प्रश्नाने मला छळू नये म्हणून मांडलेला हा प्रपंच!!
✒️
rajshelkesir@gmail.com
No comments:
Post a Comment