◾
नुकतंच एका कविता लेखनाच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. स्पर्धा छान झाली. आयोजन भव्यदिव्य होते. कवितेच्या अंगाने काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.
▪️
दहा-वीस वर्षांपूर्वी काव्य लेखनाच्या स्पर्धा जेवढ्या उदंडपणे आणि उत्साहात व्हायच्या, तेवढ्या सध्या महाविद्यालय स्तरावर होत नसाव्यात. तरुण पिढीला काव्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी कमी मिळत असावी.
▪️
मोबाईल ने बऱ्याच कवींमधला कवी मारून टाकला आहे.
▪️
एखाद्या विषयावर कविता लिहायची म्हटल्यास चक्क गुगलवर सर्च करून ती कॉपी-पेस्ट करण्याचा व खाली आपले नाव टाकण्याचा जमाना आला आहे.
परंतु कविता लेखनाच्या स्पर्धेमध्ये जर आपण गुगलवर सर्च करून लिहिलं तर सहज पकडले जाऊ शकतो, कारण परीक्षकांकडेही मोबाईल फोन आहे, हे नवीन कवींच्या लक्षात येत नाहीये!
▪️
नव्या कवींचं वाचन कच्चं आणि कमकुवत आहे. तेच तेच शब्द घोळून पीठ पाडण्याचा प्रकार दिसतो आहे. विजेत्या कवींना किमान तीन काव्यसंग्रह पुरस्कार म्हणून दिले जावेत म्हणजे तरी त्यांचे वाचन वाढेल. स्वतः वाचक नसलेले लेखक बनून इतरांना वाचण्यासाठी भाग पाडत आहेत. वाचक वाचावेत म्हणून तरी लेखकांनी चौफेर वाचक बनणे आवश्यक आहे.
▪️
मुक्तछंदाच्या नावाखाली चक्क निबंध लिहिणारे कवी संख्येने वाढत आहेत. मुक्तछंदातही एक छंद असतो, एक लय आणि ताल असतो, हे ओरडून कोणीतरी सांगण्याची नितांत आवश्यकता आहे.
▪️
चारच कडव्यांची परंतु भारदस्त आणि आशय संपन्न कविता लिहिणे भल्याभल्यांना जमत नाहीये. कडव्यांची आगगाडी म्हणजे कविता नव्हे हे नव्या कवींना सांगणे आवश्यक आहे.
▪️
काही कवी खरोखर कवितेसाठी दिवाने पागल झालेले आहेत व शत प्रतिशत कवितेमध्ये रमत आहेत, त्यांचे भविष्य उज्वल आहे!
▪️
बक्षीसासाठी पेक्षा बक्षिसाआधी चांगली कविता लिहिता येणे हे कवीचे सदभाग्य आहे. ते बऱ्याच जणांना लाभते आहे.
◾
आणि शेवटी,
ताजा कलम:
काही कवींचे हस्ताक्षरही' खराब आहे!!
-राजेश्वर पांडुरंग शेळके
9423542224
No comments:
Post a Comment